प्रिय "तू"स,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
कशी आहेस? खर तर हे माझं तुला लिहिलेलं पहिलच पत्र. तू म्हणालीस की तुझ्याविषयी, तुझ्या आयुष्याविषयी लिहिशील का? मी जर चाटच पडलो. म्हटलं असं कसं लिहिणार आणि लिहायचं म्हटलं तरी सगळं नीट मनापासून लिहिलं पाहिजे, तुझ्याविषयी माझ्या मनात असलेल्या भावना, तुझे चांगले, वाईट गुण, आवडत्या आणि नावडत्याही गोष्टींचा उल्लेख येणार आणि जर तो नाही आला तर मग अख्खं लिखाणाच मिळमिळीत होऊन जाईल एखाद्या राजकारण्याने दिलेल्या paid news सारखं. पण मग म्हटलं लिहावं, लिहून तर बघू. मी पण असं कोणाविषयी direct लिहिलं नव्हतं कधी.
तुला आठवतं, आपल्या पहिल्या समोरासमोरील भेटीत पाऊस पडला होता. मला पाऊस अजिबात आवडत नाहीआणि तुला मात्र भयंकर आवडतो. कदाचित हा पहिला विरोधाभासच आपल्या मैत्रीची आश्वासक सुरुवात करायला कारणीभूत ठरला असावा. सप्टेंबर २०१५ मध्ये मी लिहिलेलं "क्षणभंगुर.." नावाचं नाटक पहायला आलेलीस तू, पण नाटक झाल्यावर येउन भेटली नव्हतीस. पण मग मी तुझ्याशी फेसबुकवर बोललो पहिल्यांदा. त्यासाठी मला तुझ्या "ही" आणि "ती" अशा दोन मैत्रिणींची रीतसर परवानगी काढायला लागलेली. त्यातली "ही" तर माझीच मैत्रीण आणि "ती" माझ्या मित्राची होणारी बायको. पर्यायाने तू,ही आणि ती आता माझ्या खास मैत्रिणी. ही आणि ती दोघीही मला म्हणालेल्या की "बिनधास्त बोल "तू"शी, तिची काळजी घे, जमल्यास तिचा खूप चांगला मित्र हो, आम्ही दोघी तिथे नसतो आजकाल, तू असलास म्हणजे मग काही tension नाही."
आणि मग finally आपण बोलायला लागलो. मग कालांतराने तू मला तुझा mobile number दिलास, आणि मग सुरु झाला हा सगळा प्रवास. माझा पटकन involve होणारा स्वभाव आहे तर तुझा जर सांभाळून वागण्याचा आणि मग माणूस पारखून involve होण्याचा. त्यामुळे तुझा विश्वास संपादन करायला आणि आपलं sharing वाढवायला मला खूप कष्ट घ्यावे लागले हे सांगायला नकोच.
तुझा एकूणच मोकळा स्वभाव आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे मी पण जर जास्तच मोकळेपणाने वागू लागलो आणि मग मला आठवतं की तू मला चांगली तंबी दिलेलीस की "माझा मोकळेपणा हा शुद्ध मैत्रीपोटी आहे, याचा दुसरा कुठलाही अर्थ काढू नकोस" अगदी हेच वाक्य नसलं तरी याच अर्थाचं बोलली होतीस. पण त्यात तुझी चूक नव्हती, वहावत जाणे हा माझा स्वभावधर्मच आहे. मलाही कुठे थांबावं हे कळत नाही. पण मग तरी तेव्हा तू सांभाळून घेतलस.
तुझा स्वभाव खूप positive आहे किंवा तू म्हणतेस तसा तो झालाय. तू पण खूप माती खाललीयेस आयुष्यात असं तुझं म्हणणं आहे, कदाचित ते असेलही खरं पण तरीही तुझ्या स्वभावातला सगळ्यात पहिला गुण कुठला लक्षात येतो तो हाच positive attitude. स्वतः बाबतीत जरा कमी पण दुसऱ्यांना समजावतांना कमालीची optimistic असतेस तू. आरडा ओरडा करणे हाही तुझ्या स्वभावाचा एक स्थायी भाव. पण ठीके काही individual characteristics असतात प्रत्येकाचे. माझा नाहीका, पहिला विचार कायम negative च असतो.
आयुष्यात दोनदा प्रेमात पडलीस तू. एकदा "हा" आणि मग "तो". प्रेम यशस्वी झालं तर कोणीच काही बोलत नाही. पण फसलं तर मोठी माणसं शेण खाल्लस आणि मित्र माती खाल्लीस असं म्हणतात.
पण प्रेमात चूक बरोबर असं काही नसतं असं मला वाटतं कारण त्या वेळी आपल्या मनाला तेच बरोबर वाटत असतं. त्यातल्या एका वेळी तर तुला खूप जास्त त्रास झाला. त्रास झाला का तू करून घेतलास या वादात आपण नको पडायला कारण शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते. "हा" काही तुला फलदायी ठरला नाही आणि "हा" विषयी आपण जास्त बोललोच नाहीये त्यामुळे त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य दिसणार नाही.
"तो" ला किमान मी भेटलोय तरी पण त्याच्या स्वभावाचा विशेष अंदाज नाही आला पण मग तरी तो ठाम नाही वाटला कधी कायम दोलायमान आणि हे मी तुला म्हणालो पण होतो.
त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय तू एकदा नाही दोनदा घेतलास आणि त्यामुळे तुझा "ही"च्याशी आणि "ती"च्याशी जरा वाजल पण. तो निर्णय चूक होता का बरोबर हे आत्ता किंवा त्यावेळेसही सांगता आलं नसतं. कुठल्याही निर्णयाचे पडसाद कालांतराने उमटतात. आणि मग ठरतं की निर्णय चांगले का वाईट ते. पण "तो" पण तुला काही फलदायी ठरला नाही. "तो" साठी तू अनेक मनस्तापही सहन केलेस, परत ताण घ्यायला सुरुवात केलीस. बऱ्याच गोष्टी निश्चित करूनही आयत्या वेळेस "तो" काही हजार झाला नाही.
ह्या सगळ्यात जर काय खरा असेल तर तुझ्या मनातल्या भावना, त्याला प्रेम म्हणा, काळाची गरज म्हणा किंवा आकर्षण म्हणा पण तू कायम तुझ्या मताशी ठाम राहिलीस. आणि हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. मग तुझं लग्न ठरलं , काहीश्या संमिश्र भावनांत तू हा निर्णय घेतलास, अनेक चांगल्या गोष्टी दिसत आहेत, सगळा नीट पार पडतंय पण तुझ्या मनात अजूनही ही शंकाआहेच की "हाच" शी लग्न करण्याचा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, "हाच" हा माझा Mr. Perfect आहे ना? लग्न आणि कुटंब सगळाच नवीन असण्याने येणारे नवनवीन अनुभव तुझं मन बावचळून टाकत आहेत. आणि राहून राहून एकाच प्रश्न मनात येतोय की हे सगळं का? आणि मीच का? कदाचित "ही" आणि "ती" यांचं ठरलेलं love marriage पाहून तुझ्या मनात शंका असेल की मग मीच arrange marriage का? कुठेतरी insecurity आहे मनात "तू"झ्या. पण मी माझ्या आजवरच्या अनुभवाने एकच सांगेन की our whole life is a gamble. इतरांना देण्यासाठी तुझ्यात असलेली positivity इथे तू वापर. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक भावना आहेत, अनेक शंका आहेत, अनामिक भीती आहे एकूणच लग्नाची आणि त्यानंतरच्या सगळ्याच गोष्टींची. कुठेतरी अजूनही "तू"ला असा वाटतंय की "हाच" ला तू अजूनही ओळखू शकलेली नाहीस. आणि ह्यात तुला "मी", "ही" आणि "ती" समजून घेत नाही आहोत. पण असं काही नाहीये. आम्ही तुझ्या इतकेच आनंदी आणि आशावादी आहोत. तुझं चांगलं व्हावं हेच आमचं ध्येय आहे. सगळं नीट होईल.
तुला सख्खा भाऊ किंवा बहिण नसल्यामुळे सगळ्या कामाचा ताण तुझ्यावर पडत आहे आणि "तू"झ्या आई बाबांवर पण. त्यामुळे तुझी होणारी घालमेल, सगळ्या गोष्टी manage करतांना होणारी ओढाताण आणि "हाच"ला द्यावा लागणारा वेळ हे सगळं manage करतांना प्रचंड दमछाक होतेय तुझी हे मला कळतंय.
पण तरीही मी हेच म्हणेन सगळं नीट होईल. फक्त झोप पूर्ण कर नीट.
तुला राग पटकन येतो, तुला इगो पण आहे, लग्न झाल्यावर सगळे बदल फक्त "तू" च का अनुभवायचे?
तू बोलघेवडी आहेस राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर पळतो पण, आई बाबांवर मनापासून प्रेम करतेस. "ही" आणि "ती" साठी जीव ओवाळून टाकतेस, त्यांच्यासाठी possessive होतेस, खूप चांगली listener आहेस आणि तितकीच काही बाबतीत stubborn पण. अनोळखी लोकांशी छान बोलतेस मह तू बागेतला watchman असू दे किंवा फिरायला येणारे आजोबा किंवा hotel मधला waiter.
बडबड्या स्वभावापायी माणसं जोडतेस आणि अगदी क्वचित गमावतेस पण.
आता थोडं माझ्या मनातलं.
मला तू पहिल्या भेटीपासून आवडलीस. ह्याला मला कुठलही नाव द्यायचं नाही. मला कधीच तुझ्यासारखी मैत्रीण नव्हती. आणि हेच मला कायम तुझ्याशी जोडून ठेवतं. मी तुझ्यावर line मारतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपली मैत्री टिकावी ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि तसच होईल असा आशावाद मी बाळगून आहे. उगाचच मला कदाचित काही घडलं असतं तर वगैरे असे फाटे फोडायचे नाहीत. जे होतंय ते छानच होतंय आणि चांगलंच होतंय. आणि चांगलंच होणार.
हे सगळं वाचून judgemental होऊ नकोस. फारसा विचारही करू नकोस. तुझं आयुष्य फक्त माझ्या नजरेतून बघत आहेस असं समज. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस. वाचून झालं की सांग delete करून टाकेन.
तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा.
GOD BLESS YOU
तुझा मित्र,
"मी"
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
कशी आहेस? खर तर हे माझं तुला लिहिलेलं पहिलच पत्र. तू म्हणालीस की तुझ्याविषयी, तुझ्या आयुष्याविषयी लिहिशील का? मी जर चाटच पडलो. म्हटलं असं कसं लिहिणार आणि लिहायचं म्हटलं तरी सगळं नीट मनापासून लिहिलं पाहिजे, तुझ्याविषयी माझ्या मनात असलेल्या भावना, तुझे चांगले, वाईट गुण, आवडत्या आणि नावडत्याही गोष्टींचा उल्लेख येणार आणि जर तो नाही आला तर मग अख्खं लिखाणाच मिळमिळीत होऊन जाईल एखाद्या राजकारण्याने दिलेल्या paid news सारखं. पण मग म्हटलं लिहावं, लिहून तर बघू. मी पण असं कोणाविषयी direct लिहिलं नव्हतं कधी.
तुला आठवतं, आपल्या पहिल्या समोरासमोरील भेटीत पाऊस पडला होता. मला पाऊस अजिबात आवडत नाहीआणि तुला मात्र भयंकर आवडतो. कदाचित हा पहिला विरोधाभासच आपल्या मैत्रीची आश्वासक सुरुवात करायला कारणीभूत ठरला असावा. सप्टेंबर २०१५ मध्ये मी लिहिलेलं "क्षणभंगुर.." नावाचं नाटक पहायला आलेलीस तू, पण नाटक झाल्यावर येउन भेटली नव्हतीस. पण मग मी तुझ्याशी फेसबुकवर बोललो पहिल्यांदा. त्यासाठी मला तुझ्या "ही" आणि "ती" अशा दोन मैत्रिणींची रीतसर परवानगी काढायला लागलेली. त्यातली "ही" तर माझीच मैत्रीण आणि "ती" माझ्या मित्राची होणारी बायको. पर्यायाने तू,ही आणि ती आता माझ्या खास मैत्रिणी. ही आणि ती दोघीही मला म्हणालेल्या की "बिनधास्त बोल "तू"शी, तिची काळजी घे, जमल्यास तिचा खूप चांगला मित्र हो, आम्ही दोघी तिथे नसतो आजकाल, तू असलास म्हणजे मग काही tension नाही."
आणि मग finally आपण बोलायला लागलो. मग कालांतराने तू मला तुझा mobile number दिलास, आणि मग सुरु झाला हा सगळा प्रवास. माझा पटकन involve होणारा स्वभाव आहे तर तुझा जर सांभाळून वागण्याचा आणि मग माणूस पारखून involve होण्याचा. त्यामुळे तुझा विश्वास संपादन करायला आणि आपलं sharing वाढवायला मला खूप कष्ट घ्यावे लागले हे सांगायला नकोच.
तुझा एकूणच मोकळा स्वभाव आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे मी पण जर जास्तच मोकळेपणाने वागू लागलो आणि मग मला आठवतं की तू मला चांगली तंबी दिलेलीस की "माझा मोकळेपणा हा शुद्ध मैत्रीपोटी आहे, याचा दुसरा कुठलाही अर्थ काढू नकोस" अगदी हेच वाक्य नसलं तरी याच अर्थाचं बोलली होतीस. पण त्यात तुझी चूक नव्हती, वहावत जाणे हा माझा स्वभावधर्मच आहे. मलाही कुठे थांबावं हे कळत नाही. पण मग तरी तेव्हा तू सांभाळून घेतलस.
तुझा स्वभाव खूप positive आहे किंवा तू म्हणतेस तसा तो झालाय. तू पण खूप माती खाललीयेस आयुष्यात असं तुझं म्हणणं आहे, कदाचित ते असेलही खरं पण तरीही तुझ्या स्वभावातला सगळ्यात पहिला गुण कुठला लक्षात येतो तो हाच positive attitude. स्वतः बाबतीत जरा कमी पण दुसऱ्यांना समजावतांना कमालीची optimistic असतेस तू. आरडा ओरडा करणे हाही तुझ्या स्वभावाचा एक स्थायी भाव. पण ठीके काही individual characteristics असतात प्रत्येकाचे. माझा नाहीका, पहिला विचार कायम negative च असतो.
आयुष्यात दोनदा प्रेमात पडलीस तू. एकदा "हा" आणि मग "तो". प्रेम यशस्वी झालं तर कोणीच काही बोलत नाही. पण फसलं तर मोठी माणसं शेण खाल्लस आणि मित्र माती खाल्लीस असं म्हणतात.
पण प्रेमात चूक बरोबर असं काही नसतं असं मला वाटतं कारण त्या वेळी आपल्या मनाला तेच बरोबर वाटत असतं. त्यातल्या एका वेळी तर तुला खूप जास्त त्रास झाला. त्रास झाला का तू करून घेतलास या वादात आपण नको पडायला कारण शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते. "हा" काही तुला फलदायी ठरला नाही आणि "हा" विषयी आपण जास्त बोललोच नाहीये त्यामुळे त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य दिसणार नाही.
"तो" ला किमान मी भेटलोय तरी पण त्याच्या स्वभावाचा विशेष अंदाज नाही आला पण मग तरी तो ठाम नाही वाटला कधी कायम दोलायमान आणि हे मी तुला म्हणालो पण होतो.
त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय तू एकदा नाही दोनदा घेतलास आणि त्यामुळे तुझा "ही"च्याशी आणि "ती"च्याशी जरा वाजल पण. तो निर्णय चूक होता का बरोबर हे आत्ता किंवा त्यावेळेसही सांगता आलं नसतं. कुठल्याही निर्णयाचे पडसाद कालांतराने उमटतात. आणि मग ठरतं की निर्णय चांगले का वाईट ते. पण "तो" पण तुला काही फलदायी ठरला नाही. "तो" साठी तू अनेक मनस्तापही सहन केलेस, परत ताण घ्यायला सुरुवात केलीस. बऱ्याच गोष्टी निश्चित करूनही आयत्या वेळेस "तो" काही हजार झाला नाही.
ह्या सगळ्यात जर काय खरा असेल तर तुझ्या मनातल्या भावना, त्याला प्रेम म्हणा, काळाची गरज म्हणा किंवा आकर्षण म्हणा पण तू कायम तुझ्या मताशी ठाम राहिलीस. आणि हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. मग तुझं लग्न ठरलं , काहीश्या संमिश्र भावनांत तू हा निर्णय घेतलास, अनेक चांगल्या गोष्टी दिसत आहेत, सगळा नीट पार पडतंय पण तुझ्या मनात अजूनही ही शंकाआहेच की "हाच" शी लग्न करण्याचा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, "हाच" हा माझा Mr. Perfect आहे ना? लग्न आणि कुटंब सगळाच नवीन असण्याने येणारे नवनवीन अनुभव तुझं मन बावचळून टाकत आहेत. आणि राहून राहून एकाच प्रश्न मनात येतोय की हे सगळं का? आणि मीच का? कदाचित "ही" आणि "ती" यांचं ठरलेलं love marriage पाहून तुझ्या मनात शंका असेल की मग मीच arrange marriage का? कुठेतरी insecurity आहे मनात "तू"झ्या. पण मी माझ्या आजवरच्या अनुभवाने एकच सांगेन की our whole life is a gamble. इतरांना देण्यासाठी तुझ्यात असलेली positivity इथे तू वापर. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक भावना आहेत, अनेक शंका आहेत, अनामिक भीती आहे एकूणच लग्नाची आणि त्यानंतरच्या सगळ्याच गोष्टींची. कुठेतरी अजूनही "तू"ला असा वाटतंय की "हाच" ला तू अजूनही ओळखू शकलेली नाहीस. आणि ह्यात तुला "मी", "ही" आणि "ती" समजून घेत नाही आहोत. पण असं काही नाहीये. आम्ही तुझ्या इतकेच आनंदी आणि आशावादी आहोत. तुझं चांगलं व्हावं हेच आमचं ध्येय आहे. सगळं नीट होईल.
तुला सख्खा भाऊ किंवा बहिण नसल्यामुळे सगळ्या कामाचा ताण तुझ्यावर पडत आहे आणि "तू"झ्या आई बाबांवर पण. त्यामुळे तुझी होणारी घालमेल, सगळ्या गोष्टी manage करतांना होणारी ओढाताण आणि "हाच"ला द्यावा लागणारा वेळ हे सगळं manage करतांना प्रचंड दमछाक होतेय तुझी हे मला कळतंय.
पण तरीही मी हेच म्हणेन सगळं नीट होईल. फक्त झोप पूर्ण कर नीट.
तुला राग पटकन येतो, तुला इगो पण आहे, लग्न झाल्यावर सगळे बदल फक्त "तू" च का अनुभवायचे?
तू बोलघेवडी आहेस राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर पळतो पण, आई बाबांवर मनापासून प्रेम करतेस. "ही" आणि "ती" साठी जीव ओवाळून टाकतेस, त्यांच्यासाठी possessive होतेस, खूप चांगली listener आहेस आणि तितकीच काही बाबतीत stubborn पण. अनोळखी लोकांशी छान बोलतेस मह तू बागेतला watchman असू दे किंवा फिरायला येणारे आजोबा किंवा hotel मधला waiter.
बडबड्या स्वभावापायी माणसं जोडतेस आणि अगदी क्वचित गमावतेस पण.
आता थोडं माझ्या मनातलं.
मला तू पहिल्या भेटीपासून आवडलीस. ह्याला मला कुठलही नाव द्यायचं नाही. मला कधीच तुझ्यासारखी मैत्रीण नव्हती. आणि हेच मला कायम तुझ्याशी जोडून ठेवतं. मी तुझ्यावर line मारतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपली मैत्री टिकावी ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि तसच होईल असा आशावाद मी बाळगून आहे. उगाचच मला कदाचित काही घडलं असतं तर वगैरे असे फाटे फोडायचे नाहीत. जे होतंय ते छानच होतंय आणि चांगलंच होतंय. आणि चांगलंच होणार.
हे सगळं वाचून judgemental होऊ नकोस. फारसा विचारही करू नकोस. तुझं आयुष्य फक्त माझ्या नजरेतून बघत आहेस असं समज. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस. वाचून झालं की सांग delete करून टाकेन.
तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा.
GOD BLESS YOU
तुझा मित्र,
"मी"